पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

0

गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

            मुंबई, दि.26 : गेट वे ऑफ इंडिया हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र  आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.पर्यटन स्थळ स्वच्छ व सुंदर ठेवणे सर्वांचेच कर्तव्य आहे. गेट वे ऑफ इंडिया परिसर स्वच्छता अभियानात सर्वजण सहभागी झाले आहेत. या उपक्रमास सर्वांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे, असे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

        जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधनू  गेट वे ऑफ इंडिया परिसरात स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पर्यटन मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी नगरसेवक हर्षिता नार्वेकर,मकरंद नार्वेकर,पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, श्रीमती अमृता फडणवीस, सहायक संचालक धनंजय सावळकर,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त एस.के.गुरव, दिव्याज फाउंडेशन, ब्राईट फ्युचर या संस्थानी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग  घेतला.

         मंत्री श्री.लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छता अभियानास मोठ्या प्रमाणात गती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पर्यटनाला गती मिळावी. पर्यटन स्थळे अधिक सुंदर व्हावी यासाठी आपण भर देणार आहोत.आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसर अधिक सुंदर दिसेल. तुमचा सर्वांचा सहभाग अत्यंत मोलाचा आहे असे मतही मंत्री श्री.लोढा यांनी व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *